Tuesday, December 26, 2017

सर्व वाघग्रस्तांना वनखात्यामार्फत गॅस कनेक्शन देणार -घुबडहेटी कोलाम पोडावर किशोर तिवारी यांची घोषणा

सर्व वाघग्रस्तांना वनखात्यामार्फत गॅस कनेक्शन देणार  -घुबडहेटी कोलाम पोडावर किशोर तिवारी यांची घोषणा 
दिनांक -२६ डिसेंबर २०१७
राळेगाव तालुक्यातील वरध   परीसरातील घुबडहेटी व सुभानहेटी येथील   कोलाम कुटुंबाना तात्काळ उज्वला योजनेमध्ये वनखात्यामार्फत गॅस कनेक्शन देण्याची घोषणा कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी घुबडहेटी  येथे आयोजित सरकार आपल्या दारी कार्यक्रमात केली . या परीसरात नरभक्षक वाघामुळे एकामागोमाग बळी जात असतांना कोलामांच्या अन्न, वस्त्र ,निवारा ,रोजगार,जमिनीचे पट्टे ,पेसामधील अधिकार ,आरोग्य सेवा यासाठी आयोजित जनतादरबारीमध्ये यवतमाळ विभागाचे मुख्य वन्य संरक्षक चव्हाण साहेब यांनी यावेळी या वाघाचा निर्मुलन करण्यासाठी परवानगीची कारवाई युद्ध स्तरावर   करण्यात आली असुन लवकरच याचा नायनाट करण्यात येणार असल्याची दिलासा देणारी माहीती यावेळी दिली . या कार्यक्रमाला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ चव्हाण ,जिल्हा पुरवडा अधिकारी भराडी साहेब ,जिल्हा कृषी अधिकारी नवनाथ कोलपकर , उपविभागीय अधिकारी संदीप अपार , गटविकास अधिकारी खेडकर , तहसीलदार हेमंत गांगुर्डे ,जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी वानखेडेसाहेब तसेच वीज ,प्रकल्प ,पोलीस विभागाचे अधिकारी या दुर्मीळ कोलाम पोडावर जातीने उपस्थित होते . 
घुबडहेटी ते सुभानहेटी हा रस्ता ठक्करबाबा योजनेमध्ये जोडण्याची तसेच  घुबडहेटीला विषेय पाईप लाईन टाकुन पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची घोषणा यावेळी करण्यात आली . 
घुबडहेटी व  सुभानहेटी हे कोलमपोड कोलाम घरकुल योजनेपासुन वंचित असल्याची तक्रार यावेळी सदाशिव अस्वले ,कवडू रामगडे ,रामभाऊ खंगारे यांनी यावेळी केली तर अख्ख्या यवतमाळ जिल्हालाच आदिवासी विभागांनी फक्त ५०७ घरकुल दिल्याची माहीती यावेळी जिल्हा ग्रामीण विकास संस्थेच्या अधिकाऱ्यांनी दिली यावेळी किशोर तिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेस समोर मांडण्याची हमी दिली व २०१९ पुर्वी सर्व कोलामांना घरकुल देण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेची माहीती कोलामाना दिली . 
यावेळी वरध येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आजारी असल्याची तक्रार सरपंच सदाशिव महाजन यांनी केली व रुग्णवाहिका कधीच जनतेच्या कमी पडत नसल्याची माहीती सुद्धा यावेळी देण्यात आली यातच प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर यवतमाळ वरून उपचार करतात अशी माहीती पंचायत समितीचे उपसभापतींनी दिल्यावर जिल्हा आरोग्य अधिकारी चवं यांनी कारवाई करण्याचे संकेत यावेळी दिले . 
कोलाम पोडावर उच्चंन्यायालयाच्या आदेशानंतरही कोलाम अन्न सुरक्षेत नसल्याचे प्रकरणसमोर आल्यानंतर सर्व कोलाम कुटुंबाना तात्काळ अन्न सुरक्षेत घेण्याची घोषणा जिल्हा पुरवडा अधिकारी भराडी यावेळी केली . 
या  कार्यक्रमाला आदिवासी नेते भोनुजी टेकाम ,अंकित नैताम ,लेतु जुनघरे ,सामाजिक कार्यकर्ते विजयराव तेलंगे ,बबनराव राळे ,अशोकराव केवटे ,प्रफुल जिड्डेवार ,भीमराव नैताम सह परीसरातील आदीवासी व शेतकरी मोठ्याप्रमाणात उपस्थित होते . 






Tuesday, December 19, 2017

Gujarat Elections: Prime Minister Modi urged to redress Indian Cotton Farmers Hardships

Gujarat Elections: Prime Minister Modi urged to redress Indian Cotton Farmers Hardships 
Date -19 December 2017
Recently outcome of Gujarat state assembly has shown the growing unrest among Indian farmers mainly cotton growers due to poor MSP and ongoing agrarian crisis raising the question over the BJP agenda of developments and apathy towards the core issues  of rural masses towards the income and poor's job opportunities,the trends of rural urban divide is due to long term hostile policies towards farmers and rural masses hence we are urging prime minister Narendra Modi to address the hardships of cotton growers related cotton price and poor market intervention and banking credit network ,Government of Maharashtra's farmers Mission chairman and veteran farm activist  Kishor Tiwari informed in press release today while reacting on the results  of assembly polls today.
Infact agrarian community at large is struggling due economic crisis as core issues related to  cost ,crop and  credit  are not addressed properly ,the measure taken by Prime  Minister in the field of soil health card , crop insurance scheme ,e-market platform,local value addition ,providing banking network to every credit starved farmers  moreover the issue of giving minimum support price on the basis  formula promised in the 2014 election that investment plus 50% profit is being ignored by state and the centre are the main reasons of growing unrest among the indian farmers and now time has come to review the issues and to resolve before 2019 general election ,Kishore Tiwari added.  




   the Prime Minister requested the Government of Maharashtra's farmers Mission adh rural India viseya to make an immediate solution to hearing issues farmers with rural India's economic backbone X-movement activists and farmers have Kishor Tiwari.
Farmers taking cash crops like rural masses and cotton are experiencing that the initiative of the State Government and the Union Agriculture and Finance Ministry is inadequate for the implementation of agricultural and rural development programs and policies given to Prime Minister Narendra Modi to scuttle the income of farmers in next five years. Kishus Tiwari has also accused the working people of the cultivators of cotton cultivation planted on 40 lacs of Maharashtra, but the politicians sitting in the aircrafts and the leaders of the government's court have launched a shameful attempt to conceal it.
The farmers of cotton cultivation of India have been affected by the pink bollworm and the farmers who have irrigation facilities have suffered huge losses this year. The Prime Minister of India's Agricultural Land Health Card Scheme, Prime Minister Agriculture Insurance Scheme, Prime Minister Agriculture Irrigation Scheme, Agriculture for Farm Equipment, Warehousing Scheme, Agriculture Crop Coverage Scheme, Krishipamp Power Allocation Scheme, the most important agricultural land based on the cost of cultivation, the issue of collateral, cotton, tur, soybean. Failure due to incomplete efforts to overcome the problem of purchase Kishore Tiwari has requested that farmers of Marathwada region of cotton-tur-soyabean farmers are also facing crisis in the state and government should seriously resolve the dispute.
Vidarbha Marathwada has been completely hit due to the sudden slowdown of pink bollworm, Kapus-Soyabean and Tuli this year. The farmers need to give the poisonous financial package to the farmers in the suicidal area and the farmers will be compensated by the cases filed by them. Claiming National and State Vs. Since there was fear that will help totaki The funds coming from the Department of Agriculture also anti-farmer policies of Prime Minister Narendra Modi has said that the request by Kishore Tiwari to give aid.
================================================== ==================

Thursday, November 30, 2017

सोनुर्ली येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला किशोर तिवारी यांची भेट - मृतक पांडुरंग पिंपळशेंडे यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकार करणार

सोनुर्ली येथील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला किशोर तिवारी यांची भेट - मृतक पांडुरंग पिंपळशेंडे यांच्या दोन्ही मुलींचा शिक्षणाचा खर्च सरकार करणार 
दिनांक -३० नोव्हेंबर २०१७
यवतमाळ जिल्हातील केळापूर तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रगतीशील युवा शेतकरी पांडुरंगजी पिंपळशेंडे यांनी गुलाबी अळीच्या हल्ल्याने चार एकरातील उभे कापसाचे पीक नष्ट झाल्यानंतर आता कर्ज कसे परत करणार . वणी येथे ११ वी व ८ वी मध्ये शिकणाऱ्या दोन्ही मुलींचा खर्च आता कसा करणार ह्या चिंतेने कालच आत्महत्या केल्याने संपुर्ण परीसरात व्यक्त होत असतांना आज  सकाळी कै वसंतराव नाईक शेती स्वालंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी सोनुर्ली येथे भेट दीली सोबत भाजप नेते शेखर जोशी ,महाराष्ट्र राज्य जल नियामक मंडळाचे सदयस ऍडव्होकेट विनोद तिवारी हे सुद्धा उपस्थित होते . 
किशोर तिवारी यांनी पांडुरंगजी पिंपळशेंडे  यांच्या आई व पत्नीशी चर्चा केली व सरकार आपल्या दोन्ही मुलींचा पुढील शिक्षणाचा पुढील संपुर्ण खर्च करणार अशी माहीती दिली . 
यावेळी सोनुर्ली परीसरातील शेतकऱ्यांशी किशोर तिवारी यांनी चर्चा केली त्यावेळी अख्ख्या परीसरातील कापसाचे पीक गुलाबी अळीने नष्ट केले असुन त्यातच कापसाला व सोयाबीन भावही मिळत नसल्याचा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या .कापसाचे पीक शेतकऱ्यांचे घरात जेमतेम ३० टक्के आले असतांना आता गुलाबी अळीने सर्वाचा सर्व पीकच खल्लास केल्याचे सांगीतले मात्र कृषी खात्याचा एकही अधिकारी साधी विचारपूसही करण्यास आला नसल्याची तक्रार यावेळी केली ,सरकार सर्व गुलाबी अळीग्रस्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी असुन सर्वाना नुकसान भरपाई मिळणार आपण रीतसर तक्रारी करा असा सल्ला यावेळी दिला. 
==================================================================

Monday, October 23, 2017

VNSSM demands urgent intervention in Pesticide Management Bill (PMB) 2017


VNSSM demands  urgent  intervention in  Pesticide Management Bill(PMB) 2017 

Dated 24th  October 2017
In a official requisition to NITI Aayog ,India's official policy making body  Kishor Tiwari veteran farm activist and chairman of Special Task Force to tackle agrarian crisis in Maharashtra late  Vasantrao Naik Sheti Swavlamban Mission (VNSSM) to urged for it's intervention of stakeholders consultation between the officials of the ministry of Agriculture and Farmer Welfare and chairpersons of various state Farmer Commissions to discuss the changes sought in the ministry of Agriculture and Farmer Welfare's draft note for withdrawal of the Pesticide Management Bill 2008 and introduction of PMB-2017 as this is of paramount importance to address crisis of pesticide poisoning as over 45 farmers have reportedly died and hundreds have become ill due to pesticide poisoning in several districts of Vidharba region in Maharashtra, since July this year. These incidents have been reported from four districts where farm workers died due to inhalation of toxic pesticides while spraying it on the fields.

“The death of farmers in Maharashtra due to pesticide poisoning is because of the gross negligence in pesticide management in the country. This negligence has led to pesticide poisoning becoming a chronic problem in the country. Every year, there are about 10,000 reported cases of pesticide poisoning in India. In 2015, about 7,000 people died because of accidental intake of insecticides/pesticides. The Ministry of Agriculture at the Centre and agricultural departments of the states are solely responsible for the unsafe use of pesticides in the country. Deaths and illnesses due to pesticides can be avoided if we can urgently fix some of the crucial gaps in our regulations and improve its enforcement,” said Kishor Tiwari in it's requisition to  NITI Aayog."this was discussed with maharashtra chief minister Devendra Fadnavis on sunday    in detail who has promised me take up this matter with central Govt. to address the issues India’s abysmal management of pesticides has started taking a deadly toll in maharashtra' Tiwari informed.    

VNSSM requisition has taken serious note of media reports that  in Maharashtra that  pesticides such as Monocrotophos, Oxydemeton-methyl, Acephate and Profenofos are believed to be responsible for the deaths and illness. Pesticides like Monocrotophos and Oxydemeton-methyl are considered class I pesticides by the World Health Organization (WHO), which are further categorised into extremely hazardous (class Ia) and highly hazardous (class Ib). The classification is based on acute toxicity of pesticide active ingredient and since class I pesticides can be fatal at a very low dose, many of these are banned in several countries. Monocrotophos is banned in 60 countries, Phorate in 37, Triazophos in 40 and Phosphamidon is banned in 49 countries. But India still allows the use of these pesticides.
In fact, there are 18 class I pesticides allowed to be used in the country. In 2015-16, of the 7,717 tonnes of pesticides (technical grade) used in the country, 2,254 tonnes were class I pesticides (about 30 per cent of total pesticides). As per the International Code of Conduct on Pesticide Management, jointly released by FAO and WHO, “pesticides whose handling and application require the use of personal protective equipment that is uncomfortable, expensive or not readily available should be avoided, especially in the case of small-scale users and farm workers in hot climates”. All class I pesticides require the use of personal protective equipment that is impossible to use by small-scale farmers and farm workers in India. On this basis itself, class I pesticides should have been banned in India long ago,Tiwari added.
=================================================================

Sunday, October 1, 2017

कीटकनाशकाने घेतले १७ जीव :या मृत्यूना कृषीविभाग व आरोग्य विभागच जबाबदार -किशोर तिवारी


कीटकनाशकाने घेतले १७ जीव :या मृत्यूना कृषीविभाग व आरोग्य विभागाचा नाकर्तेपणाचं जबाबदार -किशोर तिवारी   
दिनांक १ ऑक्टोबर २०१७
यवतमाळ जिल्ह्यात कापूसाच्या उभ्यापिकावर  बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबगचे प्रचन्ड हल्ला रोखण्यासाठी  प्रोफेक्स सुपर वा पोलो या सारख्या अतिविषारी 'कीटकनाशकाच्या  फवारणीमुळे १६ शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या या पंधरवड्यात  मृत्यू झाला असल्याची व ६००च्या वर लोकांना विषबाधा  झाली असल्याची माहीती कै वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष  किशोर तिवारी यांनी यवतमाळचा गावोगावी दौरा केल्यानंतर दिली या मृत्यु पडलेल्या  शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या कुटुंबाना सरकार प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याची व दवाखान्यावर आलेला संपुर्ण खर्च देणार असल्याची माहीती यावेळी दिली तसेच या मृत्यू तांडवाची सारी जबाबदारी शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या डोक्यावर उच्चसमितीच्या अहवालाच्या नांवावर  मांडण्याचा घाणेरडा व खोटारडा  प्रकार आपण हाणून पाडणार असुन या मृत्युची संपुर्ण जबाबदारी कृषी व आरोग्य विभागाची असल्याने यांच्यावरच सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या सरकारी नौकरीमधून हकालपट्टी करण्याची मागणीच तिवारी यांनी केली आहे  
 यवतमाळ जिल्ह्यामध्ये शेतकरी मिशनने उमरखेड पुसद, आर्णी ,दिग्रस ,दारव्हा ,यवतमाळ ,राळेगाव , कळबं ,मारेगाव, केळापुर व वणी या ठिकाणी मागील चार दिवसात दौरे करून माहीती जुळविल्यानंतर जिल्हयात सुमारे ७५० रुग्णामध्ये आदीवासी   शेतमजूर व अल्प भुधारक शेतकऱ्यांच्या समावेश असुन आतापर्यंत  १७ पेक्षा जास्त प्रकरणांमध्ये किटकनाशची बाधा झालेले निरपधार जीव गमावले असुन  यामध्ये जीवगांवचे शंकरराव आगलावे ,आमलोनचे दत्ता टेकाम, शेंदूरघानींचे दीपक मडावी नायगांव गावचे दशरथ चव्हाण,कळंब शहराचे देविदास माडीवी, जामनी गावचे कैलाश पेंदोर ,कळंब गावचे आयुब शेख, कळंबचे अनिल चव्हाण, घाटंजी गावाचे रमेश चिरावार,उचेगाव गावचे रवी राठोड,पहापळचे  विठ्ठलराव पेरकेवार टेम्भीचे विलासभाऊ मडावी ,मारेगावचे वसंतराव  सिडाम, कालेगाव  मारोतराव  पिंपळकर ,घोडधरा  गावातील दिवाकर घोसी,टाकळी  गावचे शंकर कदम  ,मानोलीचा बंडूभाऊ सोनुर्ले यांचा समावेश असून जर आरोग्य विभाग व कृषी विभाग असाच झोपाकाढत असल्यास  या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणात  वाढ होण्याची भीती किशोर तिवारी व्यक्त केली आहे . 
श्री. तिवारी यांनी मृतांसाठी अमेरीकेच्या  सुधारित बीटी कापूस बियांना दोष दिला. ते म्हणाले, "बीटी कापूस बियाण्यानी बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबग व इतर उपद्रव यांचे प्रतिकार करणे अपेक्षित आहे. तथापि, ते कीड हाताळण्यात अयशस्वी ठरले आणि यामुळे विषारी व आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी असलेल्या मोनोक्रोटोफॉसचा वापर करण्यात आला, एक अत्यंत विषारी कीटकनाशक, ज्यामुळे वनस्पती हिरव्या आणि निरोगी दिसतात परंतु गुलाबी बोल्मोंडची पुनरुत्थान होते. शेतकरी गैर-शिफारसीय जोड्या वापरतात म्हणून विषारी रसायनांच्या बाधेची  शक्यता वाढते. जिल्ह्यापरिषदेचे आरोग्य व कृषी जर पैसे खाण्यात गुंतले नसते व कामावर वेळेवर लक्ष दिले असते हे बळी टाळता आले असते याला जबाबदार यंत्रणा जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला असेच आदिवासींचे व शेतकऱ्यांचे व्यवस्थेचे बळी मोजावे लागतील असा निर्वाणीचा इशारा तिवारी यांनी दिला "
 महाराष्ट्रातील कापसाच्या लागवडीखालील क्षेत्र सर्वात मोठा आहे (४० लाख हेक्टरपेक्षा जास्त)  जर राज्याने रासायनिक शेतीवर बंदी घातली नाही तर आणि आदिवासी शेतकरी कामगार मरतील,नापिकीमुळे  आत्महत्यांची संख्या वाढण्याची भीती तिवारी यांनी व्यक्त केली  आहे.

Saturday, September 30, 2017

Yavatmal Pesticide Poisoning toll raises 15 - Task force urge GOI to address Core Issues of Crisis


Yavatmal Pesticide Poisoning toll raises 15 - Task force urge GOI to address Core Issues of Crisis



Dated-30 september 2017

As many as 15 deaths of innocent tribal farm workers and farmers & more than 600 cases of  inhalation infection after pesticides poisoning reported in last 15 days in farm suicides ridden Yavatmal district of maharashtra ,Indiscriminate and faulty use with wrong combinations of pesticides, and direct and extended exposure without any protective gear for days together to insecticides are some of the apparent reasons for the death of farmers and farm workers in Yavatmal district in the last two months but core issues related to genetically modified Bt cotton seeds that are supposed to be resistant to bollworm and other infestations failed to serve the purpose resulting massive pesticide spray along with  use of very toxic and internationally banned monocrotophos (class I pesticide) which  makes the plants look very green and healthy but it also causes resurgence of pink boll worm. "The chances of exposure to toxic chemicals increase as the farmers use many non-recommended combinations,The chief of Vasantrao Naik Shetkari Swavalamban Mission (the state government task force to deal with farm distress) Kishore Tiwari informed today. 

The victims are 
1.Dashrath Chavan (50) from Naygaon in Darwha tehsil; ; 
2.Devidas Madavi (52) from Kalamb;
3.Kailash Pendor (45) from Jamni in Patan; 
4.Ayub Sheikh (30) from Kalgaon in Digras tehsil; 
5.Anil Chavan (24) from Kalamb;
6.Ramesh Chirawar (45) from Ghatanji and 
7.Ravi Rathod (35) from Uchegaon   
8.Vithal Parkewar pahapal kelapur
9.Pradip Soyam tembhi kelapur
10.Vasant Sidam Maregoan 
11.Maroti Pimpalkar Kalegoan
12.divakar Ghoshi Ghoddara
13.Shankar Kedam Talki 
14.Dipak Madavi shendurghani Arni 
15.Bndu Sonurle from Manoli  ,all are  in Yavatmal district 

The team experts tem visited in crisis hit area  found that most of the farm labours engaged in spraying want to cover as much areas as possible in a single day to earn more. Also, they try to work in as many fields as possible in the season. They end up working for 8-10 hours a day at a stretch whereas they should be working just in morning hours without eating or drinking. 
"The farmers take smoke breaks, tobacco chewing breaks or drink water with the same hands that they are spraying with without washing hands. They don't wear a shirt allowing more body area to be exposed to pesticide,"
Earlier The chief of Vasantrao Naik Shetkari Swavalamban Mission (the state government task force to deal with farm distress) Kishore Tiwari has claimed this year the situation could be worse as it is found that the Bt cotton seeds were now susceptible to attack of not only pink worm, but also thips , mealybug and regular bollworm. With over 40 lakh hectares under cotton cultivation, Maharashtra has largest area of cotton crop in the country.
The state Previous agriculture commissioner S Kendrekar is believed to have apprised deputy director (quality control) of Union agriculture ministry on August 1 about the situation. According to him, last year too incidents of pink worm attacks were reported and confirmed by CICR too hence now in order to stop victimization and killing innocent tribal farm workers state has to ban chemical farming in this farm suicide hit region of indian ,TIwari urged .
=================================================================



Thursday, August 24, 2017

खैरगाव (देशमुख) कोलाम पोड येथे २५ आगस्टला "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम

यवतमाळ जिल्यात सर्वांना अन्न सुरक्षा ,घरासाठी व शेतीचे पट्टे यासाठी शेतकरी मिशनची मोहीम  : केळापूर  तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड   येथे २५ आगस्टला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम 
दिनांक २४ ऑगस्ट  २०१७
 मा . मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या सूचनेनुसार "सरकार आपल्या दारी" या कार्यक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी यांच्या तक्रारीची सुनावणी व  जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून  समाधान व कारवाई साठी अधिकारी -कर्मचारी चेतना जागृती अभियानाचा एक भाग म्हणून  यवतमाळ जिल्यात  केळापूर  तालुक्यातील खैरगाव (देशमुख) कोलाम पोड   येथे २५ आगस्टला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम   नसुनावणी ठेवण्यात आली आहे . खैरगाव देशमुख ,वांजरी ,झुली ,पहापळ,बोथ,जवाहर नगर,मारेगाव,जाम , कोदोरी सुकळी  रूढा घुबडी  वळवाट पिठापोंगरी खैरी येथील  कोलाम पोडावरील आदिवासींच्या येथील गावकऱ्यांच्या जमिनीच्या मालकीचा प्रश्न ,घरकुल योजनेच्या अडचणी  शेतकऱ्यांच्या शेती मालविक्रीसाठी येत असलेल्या अडचणी  आतापर्यंत  नवीन पिककर्ज ,मुद्रांकर्ज वाटप, ग्रामीण जनतेला काम व खावटी  ,अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण ,प्रकल्पग्रस्तांचे अनेक  प्रश्न यांना सरकार ,प्रशासन ,लोक प्रतिनिधी व सामाजिक संस्था यांच्या पुढाकाराने  सोडविण्यात  येतील अशी माहीती  मिशनचे  प्रमुख किशोर तिवारी यांनी आज एका पत्रकाद्वारे दीली . 

यवतमाळ जिल्यात आदिवासी बहुल भागात पिवळ्या  शिधा वाटप नाहीत अशा प्रचंड तक्रारी येत आहेत अनेक कोलाम  व पारधी पाड्यात जनतेला घरकुल योजना मिळत नसुन कारण घराचे पट्टे मालकीचे नाहीत   अनेक तांत्रिक अडचणी प्रशासन समोर करीत वर्षानुवर्षं हा प्रश्न रेंगाळत आहे तसेच वंचितांना  आजही अन्न ,आरोग्य ,गुरांना चारा व पाणी यासह वीज वितरण ,शिक्षण  यांच्या समस्या आहेत यासर्व बाबीवर गंभीरपणे तोडगा काढण्यासाठी केळापूर  तालुक्यातील  खैरगाव देषमुख  येथे  येत्या  ९ मार्चला   "सरकार आपल्या दारी" कार्यक्रम हा कार्यक्रम कै वसंतराव नाईक शेतकरी  मिशनने आयोजित केला आहे या कार्यक्रमाला प्रशासनकडून   महसूल , कृषी ,ग्रामविकास ,वीज वितरण ,अन्न पुरवठा ,आरोग्य ,रोजगार ,शिक्षण , पोलीस प्रशासन यांच्या विभागाच्या  तालुका व  ग्रामस्तरीय अधिकारी -कर्मचारी उपस्थित राहणार असुन या भागातील लोकप्रिय आमदार डॉ अशोक उईके व आमदार राजाभाऊ तोडसाम   यांचेसह सर्व जिल्हा परिषद व पंचायत समितीचे सद्यस तसेच सर्व सरपंच व ग्रामपंचायतीचे  सद्यस यांना सादर आमंत्रित करण्यात आले असुन ,ग्रामीण जनतेनी आपल्या सर्व अडचणी व सरकारी योजनामध्ये होणाऱ्या गैरप्रकार समोर आणण्याकरिता कार्यक्रमात सहभागी होण्याचे  आवाहन शेतकरी मिशनचे अध्क्षश किशोर तिवारी यांनी केली आहे   

================================================

Sunday, August 20, 2017

किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात

किशोर तिवारी  २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात   
दिनांक २० ऑगस्ट २०१७
स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी व केळापुर तालुक्यातील आदीवासी वंचितांच्या वीज पुरवढ्यामध्ये खंड , आरोग्याच्या समस्या ,अन्न सुरक्षा ,निराधार , पीककर्ज ,शिक्षण ,ग्रामीण विकास ,आदीवासी योजना,वरळीमटका ,जुगार ,दारू विक्री   व टिप्पेश्वर अभयारण्यामुळे होत असलेला वन्यप्राण्याचा त्रास , टिप्पेश्वर अभयारण्यामध्ये होत असलेली जंगल तोड ,पारवा व अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था याची पाहणी व जनतेच्या समस्याची सुनावणी जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकाऱ्यासोबत करणार आहेत . या दौऱ्यात किशोर तिवारी दुपारी ४ वाजता    सावंगी (सगदा ),संध्याकाळी ५ वाजता मंगी  येथे  ,संध्याकाळी ६ वाजता भीमकुंड येथील टेकडीवर राहणाऱ्या आदिवासींच्या समस्यांची सुनावणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी ७ वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी वर्गास पाऊसामुळे होत असलेल्या त्रासापासुन वाजविण्याकरिता उपाय योजनेवर चर्चा करतील . या जनसंपर्क दौऱ्याचा फायदा वंचितांना व आदिवासींनी घ्यावा अशी विनंती स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे जनसपंर्क अधिकारी अशोक कापर्तीवार यांनी केली आहे . 




Saturday, August 12, 2017

आदीवासी भागात संपुर्ण दारूबंदी करा : पांढरकवडा येथे पेसा गावाच्या सरपंच मेळाव्यात एकमुखी ठराव


आदीवासी भागात संपुर्ण दारूबंदी करा : पांढरकवडा येथे पेसा गावाच्या सरपंच मेळाव्यात एकमुखी ठराव 
ग्रामसभेने विविध ठराव घेवून प्रशासनाकडे पाठवावे - किशोर तिवारी 
दिनांक -१३ ऑगस्ट २०१७ 

अनुसुचित क्षेत्र स्थानिक स्वराज्य विकास मंडळ (महासंघ) पांढरकवडा व पेसा कायदा वनहक्क कायदया अंतर्गत असलेल्या ग्रामसभांचा सरपंचाच्या  यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत पेसा लोकप्रतिनिधींचीमेळाव्यात  स्थानिक सुराणा भवन पांढरकवडा येथे आज शनिवारी  संपुर्ण दारूबंदी सह आदिवासींच्या घटनादत्त अधिकारांच्या पुनर्स्थापनेसाठी रणशिंग फुकण्यात आले .या मेळाव्यात    कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष मा. श्री किशोर तिवारी (राज्यमंत्री दर्जा) यांची प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी पांढरकवडा येथील तहसिलदार महादेवराव  जोरवार पांढरकवडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकरराव घसाळकर. राळेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी खेडकर, सरपंच महासंघाचे अध्यक्ष तुळशीराम कुमरे, पंचायत समीती पांढरकवड्याचे संतोषराव  बोडेवार , आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम, शेतकरी नेते सुरेशभाऊ  बोलेनवार यांच्या मेळाव्यात उपस्थित होते . यावेळी किशोर तिवारी यांनी  मार्गदर्शन करतांना पेसा अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायतच्या ग्रामसभेने कोणकोणते ठराव घ्यावेत यावर ठरावाचे वाचन करीत मार्गदर्शन केले. त्यात  प्रमुखपणे दारू विक्री व संपुर्ण दारूबंदी  ठराव, पेसा ग्रामपंचातमध्ये १००टक्के अंत्योदय लागू करावा ,पेसा गावात विविध संस्थांना प्रतिबंध घालून ग्रामसभेने ठराव मंजूर करूनच  परवानगी घेतलेल्यांना विकास कामे करण्यासाठी अनुमती मिळावी, पेसा गावाला थेट  निधी आवंटीत करावा, पेसा गावात आरोग्य उपकेंद्रे स्थापन करण्यात यावे, पेसा ग्रामपंचायतच्या वनपरिक्षेत्रातील वृक्ष कटाई पुढील १० वर्षाकरिता प्रतिबंधीत करावी असे महत्वाचे एकुण २५ ठराव मेळाव्यात ठेवण्यात आले व उपस्थित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवकांनी त्याला आपले अनुमोदन दिले   त्यानंतर उपस्थितांना हे ठराव येत्या १५ आगस्टला आम सभेत पारीत करण्याचे  आवाहन मा.ना. किशोर तिवारी यांनी केले. त्यानंतर मंचावर उपस्थितांपैकी तुळशीराम कुमरे, धर्माभाऊ आत्राम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी घसाळकर राळेगांव चे गटविकास अधिकारी खेडकर व काही सरपंचांनी मंचावर येवून पेसा अंतर्गत येणार्र्या ग्रामपंचायतींसाठी ठराव सुचविले त्यात गौण उत्खननाची परवानगी ग्रामसभेतून घ्यावी व हर्रास झालेली रक्कम त्या पेसा ग्रामसभेला मिळावी, गोडाऊन व मंगलकार्यालय बांधावे, पेसाचा एका गावाला  एकच ग्रामसेवक असावा, कम्युनिटी राईटस् च्या नावाखाली विकास कामांमध्ये असलेले वनसंस्थांचे सरकारी अतिक्रमण पेसा ग्रामपंचायत मधून हटवावे, पेसा अंतर्गत ग्रामंचायत मध्ये राहणाऱ्या  आदिवासी बांधवांना शुध्द पिण्याचे पाणी देण्यात यावे, मागेल त्याला घर ही योजना राबविण्यात यावी प्रत्येक गावाला विद्युत पुरवठा आणि मराठी गोंडी कोलामी भाषा येणारा शिक्षक पेसा ग्रामपंचायत मध्ये येणाऱ्या  शाळांमध्ये नियुक्त करावे  असे विविध ठराव सुचविण्यात येवून ते ग्रामसभेने पारीत करून शासनदरबारी पाठवावे अशा सुचना या मेळाव्यात  करण्यात आली . सदर मेळाव्याला पेसा अंतर्गत येणार्र्या ग्रामपंचायतशी संबंधीत लोकप्रतिनिधींची उपस्थिती  लाभल्याने कै. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी जनप्रतिनिधींना धन्यवाद दिलें  त्याचबरोबर सदर ग्रामसभेने जे जनप्रतिनिधी विकास कामांच्या आपल्या सेवेत खरे उतरणार नाही त्यांना परत बोलविण्याचा अधिकार प्रदान करावा असा ठराव घेण्याबाबतही यावेळी मेळाव्यात  उपस्थित ग्रामसेवक सरपंच व उपसरपंच यांना सुचविण्यात आले. या मेळाव्याचा  समारोप खेळीमेळीच्या वातावरणात झाला यावेळी उपस्थितांचे आभार पेसा अधिकारी आशिष विनकरे यांनी मानले . 

Tuesday, August 8, 2017

स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन पत्रपरीषद निवेदन

स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन पत्रपरीषद निवेदन   
दिनांक -९ ऑगस्ट २०१७
मागील पत्रपरीषदमध्ये  ठरल्याप्रमाणे शेतकरी मिशनच्या कारवाईचा अहवाल व पाठपुरावा या विषयावर आपणाशी चर्चा  करण्यासाठी आज ही पत्रपरीषद घेण्यात येत आहे . 
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनकडुन महाराष्ट्राच्या कृषीसंकटाचा व ग्रामीण भागातील आर्थिक समस्याबाबत नीतीआयोगासमोर व पंतप्रधान कार्यालयात  विस्तृत  मांडणीकरून  राज्य सरकारच्या कामाचा आढावा सादर करण्यात आला (नीती आयोगाच्या बैठकीचा अहवाल सोबत जोडला आहे ( जोड पत्र -१). शेतकरी मिशनकडून यवतमाळ ,वाशीम ,वर्धा व अमरावती जिल्ह्याचा कामाचा आढावा घेण्यात आला . स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनची मासीक बैठक ३१ जुलै रोजी घेण्यात आली यामध्ये सर्व जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यपालन अधिकारी ,पोलीस अधिकारी ,कृषी ,आरोग्य ,पतपुरवडा ,सहकार ,वीज ,सिंचन ,दुग्ध ,मत्स्य ,वन व आदिवासी विभागाच्या कामाचा आढावा घेण्यात आला व खालील निर्णय घेण्यात आले . 
ग्रामीण भागात मागेल त्याला अन्न 
ग्रामीण भागातील गरीब व पात्र असणाऱ्या  सर्वांना  अन्न सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला (पहा जोड पत्र २)
आदीवासी शेतकरी व शेतमजुरांना नव्याने खावटी कर्ज  
सर्व  आदीवासी शेतकरी व शेतमजुरांना जुने खावटी कर्ज माफ करून नवीन खावटी कर्ज देण्याचा प्रस्ताव मिशनने सरकारला दीला आहे .  (पहा जोड पत्र ३)

राज्यातील मक्तेदार वा बटाईदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी समावेश करावा 

राज्यातील मक्तेदार वा बटाईदार शेतकऱ्यांच्या कर्जमाफी समावेश  करण्याची अतिशय महत्वाची मागणी मिशनने सरकारला केली आहे (पहा जोड पत्र ४). 

पीक कर्जमाफी व पिकविम्याबाबत मिशनकडून राज्यपातळीवर शेतकऱ्यांना सहकार्य 

अडचणीच्या पात्र शेतकऱ्यांना तातडीची १० हजाराची मदत व पीक कर्जमाफीच्या व्याप्तीची संपुर्ण माहीती देण्याची   महत्वाची मागणी मिशन कामगीरी पार  पाडत  आहे . 

स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन अस्तिव व सामाजीक बांधिलकी 
स्व. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन हे महाराष्ट्राच्या हरीत क्रांतीचे जनक व शोषितांचा आवाज म्हणुन अमर झालेले माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांचे स्वप्न साकार करण्यासाठी अशासकीय शेतकरी चळवळीच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भ व मराठवाड्याच्या १४ जिल्ह्यात सुरू केलेला प्रयोग असुन सरकारला आज पर्यंत कवडीची निधी न मागता आपण सर्व भ्रष्ट्र अधिकारी व पोटभरू नाकर्ते राजकीय नेते यांचे गोरखधंदे बंद करुन वंचितांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयन्त आहे आपण याला सहकार्य करावे 

आपला नम्र 



किशोर तिवारी 









Tuesday, June 20, 2017

'शेतकरी आंदोलन राजकीय, देवेंद्र विदर्भाचे असल्याने अनेकांच्या पोटात गोळा'-By: सरिता कौशिक, एबीपी माझा, नागपूर

'शेतकरी आंदोलन राजकीय, देवेंद्र विदर्भाचे असल्याने अनेकांच्या पोटात गोळा'

http://abpmajha.abplive.in/maharashtra/kishor-tiwari-on-sakanu-committee-cm-devendra-fadnavis-421288
'शेतकरी आंदोलन राजकीय, देवेंद्र विदर्भाचे असल्याने अनेकांच्या पोटात गोळा'
नागपूर: भाजप जिंकून विदर्भाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा उठला आहे. शेतकरी आंदोलन हे राजकीय होतं. त्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते, असा आरोप सरकारच्या ‘वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशन’चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला.
तसंच सुकाणू समितीच्या मागण्या अतिशय चुकीच्या आणि गैर आहेत, कर्जमाफीची आवश्यकताच नाही, असा दावाही त्यांनी केला.
ज्या पद्धतीने भाजप जिंकले आणि विदर्भाच्या देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळाले, त्यामुळे सर्वांच्या पोटात गोळा उठला आहे, असं तिवारी म्हणाले.
शेतकरी आंदोलन करणारे कोण, चालवणारे कोण, त्यांच्या पाठीमागे कोण? याबाबतचे व्हिडीओ आम्ही पहिले. हे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. हे आंदोलन राजकीय होतं”, असा दावा किशोर तिवारी यांनी केला.
“शेतकऱ्यांचा जितका राजकीय नेत्यांवरचा विश्वास उडाला आहे, त्यापेक्षाही डबल शेतकरी नेत्यांवरुन विश्वास उडाला आहे. हे मांडवली करतात. आपली सोय झाली की विषय सोडून देतात”, असं तिवारी म्हणाले.   
खासदार राजू शेट्टी हे मोदींच्या कुबड्यांमुळे निवडून आले आहेत. ते आपला एकही माणूस निवडून का आणू शकले नाहीत, असा सवाल किशोर तिवारी यांनी केला.
जे सुकाणू समितीत आहेत किंवा कायदा- सुव्यवस्थेच्या गप्पा करत आहेत, त्यांना बोलण्याचा नैतिक अधिकार आहे का? असाही सवाल त्यांनी केला.
“देवेंद्र फडणवीस हे गरिबांपर्यंत थेट पोहोचत असल्यामुळे, भाजपच्या आतील आणि बाहेरील नेत्यांना भीती वाटत आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीतून आलेले आणि ज्यांना लवकर श्रीमंत बनण्याची इच्छा आहे, त्यांना भीती वाटत आहे. देवेंद्र चांगले काम करु इच्छित आहेत, त्यामुळे मी त्यांना साथ द्यायला आलो आहे. मला भाजपच्या दांभिक नेत्यांशी काही घेणे देणे नाही” , असं किशोर तिवारी म्हणाले.

Thursday, January 26, 2017

केंद्रीय अर्थ संकल्पात महाराष्ट्राच्या कोरडवाहू दुष्काळ्ग्रस्त शेतकऱ्यांना विषेय पॅकेज द्या -किशोर तिवारी

केंद्रीय अर्थ संकल्पात महाराष्ट्राच्या  कोरडवाहू दुष्काळ्ग्रस्त शेतकऱ्यांना विषेय पॅकेज द्या -किशोर तिवारी 
दिनांक  २५ जानेवारी २०१७
नोटबंदी नंतर सरकारी  बँकात  सुमारे १५ लाख कोटीवर पैसा जमा झाला असुन  नोटबंदीच्या निर्णयाचा महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेनी व शेतकऱ्यांनी जबरदस्त पाठींबा दिला व सतत दोन महीने अनेक वेदना व अडचणी सहन करीत येत्या केंद्रीय अर्थ संकल्पात  शेतकऱ्यांना त्यांच्या मुलभुत अडचणी त्यामध्ये थकीत कर्जापासुन मुक्ती व नव्याने पीककर्ज ,महाराष्ट्राच्या कोरडवाहू दुष्काळग्रस्त भागातील नगदी पीक कापुस ,सोयाबीन तूर या पिकांचे  हमीभाव ,बाजारामध्ये शेतकऱ्यांना बाजार भाव पडताना वाचविण्यासाठी केंद्रीय अर्थ संकल्पात विशेष भाव स्थिरता निधी व सशक्त यंत्रणा ,गावपातळीवर कृषी मालाची प्रक्रिया उद्योगासाठी विषेय योजना  ,कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी व गावपातळीवर धंद्यासाठी मुद्रा योजनेमधुन सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सक्तीचा  या  दूर करण्यासाठी विषेय आर्थिक पॅकेज घोषणा येत्या केंद्रीय अर्थ संकल्पात सरकारने करावी अशी आग्रही मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली याना केली आहे . 
थकीत कर्ज व  नवे पीककर्ज 
सरकारी बँका शेतकऱ्यांना नव्याने पीक  कर्ज  देण्यास टाळाटाळ करीत असतात व जुने सतत दुष्काळ व नापिकीमुळे थकीत झालेले जुने पीक कर्ज  ही मोठी समस्या असुन यावर तोडगा निघणे ही काळाची गरज झाली आहे  कारण आत्महत्याग्रस्त विदर्भ व मराठवाड्यात शेतकऱ्यांना बँकांची दारे बंद झाल्यामुळे आता यावर तोडगा काढण्यात यावा बँका मुंबई मध्ये बसुन आपल्या कृषी कर्जाच्या लक्ष्य शेतकऱ्यांना  न  देता सरळ खाजगी मायक्रो फायनान्स कंपनीला ,कृषीवर आधारीत उद्योगांना देतात यावर सरळ पीक कर्ज इतर कृषी कर्ज सरळ शेतकऱ्यांना देण्याची मागणी शेतकरी मिशनने केली आहे . 
कापुस ,सोयाबीन तूर या पिकांचे  हमीभाव व सरकारचे खुल्या बाजारात शेतकऱ्यांना संरक्षण 

मागील तीन वर्षापासुन  महाराष्ट्राच्या कोरडवाहू दुष्काळग्रस्त भागातील नगदी पीक कापुस ,सोयाबीन तूर या पिकांचे  हमीभाव  लागवडीचा खर्च व  बाजार भाव यामध्ये प्रचंड तफावत असल्यामुळे शेतकऱ्यांची खुली लुट होत आहे सरकारने हमीभावाबाबत राष्ट्रीय कृषी आयोगाच्या शिफारशींवर गंभीरपणे अंतिम अंबालबजावणीचा निर्णय घ्यावा मागणी शेतकरी मिशनने केली आहे . 
कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी शेतकऱ्यांना सरळ विनातारण कर्ज देण्याची मागणी 

कृषीवर आधारीत प्रक्रिया उद्योगासाठी व गावपातळीवर धंद्यासाठी मुद्रा योजनेमधुन सर्व शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठी बँकांना सक्ती करणारी योजनेची घोषणा  केंद्रीय अर्थ संकल्पात सरकारने करावी अशी आग्रही मागणी वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे प्रमुख किशोर तिवारी यांनी केंद्रीय अर्थमंत्री  अरुण जेटली याना केली आहे .