Wednesday, August 22, 2018

किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा

किशोर तिवारी करणार २३ ऑगस्टला पुरग्रस्त दुर्भा -सतपेल्ली भागाचा दौरा 
दिनांक -२२ ऑगस्ट २०१८
पैनगंगेच्या पुराने झरी तालुक्यातील धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली या गावालगतच्या हजारो हेक्टर वरील उभे पीक खरडून गेल्याने तसेच धानोरा दुर्भा दिग्रस सतपेल्ली वढोली वस्तीतील घरे मोठ्याप्रमाणात नुकसानीच्या पाहणी करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी येत्या गुरुवार २३ ऑगस्टला पाहणी दौरा करणार असुन त्यांच्या सोबत जिल्हा परिषद सद्यस सुरेशभाऊ मानकर व  मीनाक्षी सुरेश बोलेनवर  दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले सुद्धा राहणार आहेत . 
 यावेळेस  झरी तालुक्यातील पैनगंगेच्या नदीच्या पुरबुडीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी सोबतच दुर्भा   येथे किशोर तिवारी यांचा येत्या २३ ऑगस्टला  दुपारी ३ वाजता  "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "आयोजित करण्यात आला आहे  . 
झरी    तालुक्यातील लिंगटी धानोरा दुर्भा दिग्रस सतपल्ली वाढोली परीसरातील  शेतकऱ्यांच्या पुरबुडीचे नुकसान पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा  हा  सरकार आपल्यादारी कार्यक्रम  आयोजित करण्यात आल्याची माहीती आदीवासी नेते धर्माभाऊ आत्राम व जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते रामलू इटवार यांनी दिली  . 
किशोर तिवारी २३ ऑगस्टला दुपारी २ वाजता धानोऱ्याला ३ वाजता दुर्भ्याला ३.३०वाजता दिग्रसला ४ वाजता सतपेल्लीला व ५ वाजता  वढोलीला भेट देणार आहेत अशी माहीती दौऱ्याचे संयोजक दुर्भ्याचे सरपंच सतीशभाऊ नागले यांनी दिली . 

Saturday, August 18, 2018

घुबडी तालुका केळापूर येथे किशोर तिवारी यांचा येत्या २१ ऑगस्टला   "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "
दिनांक -१९ ऑगस्ट २०१८
केळापूर तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा,घुबडी,वळवाट,खैरी,पिठापोंगरी, पिंपळशेंडा ,अर्ली 
परीसरातील शेतकऱ्यांच्या वन्यप्राणी ,पीककर्ज माफी  पीककर्ज वाटप,तसेच  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा   सरकार आपल्यादारी कार्यक्रम   येत्या २१ ऑगस्टला दुपारी ४ वाजता  घुबडी येथे आयोजित करण्यात आला  आहे.  महाराष्ट्र सरकारच्या बळीराजा चेतना  अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या व   लोककल्याणाच्या  योजना राबविणाऱ्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गावाच्या चावडी हजर करून सर्व  तक्रारीचे समाधान करण्यासाठी  असा अभिनव उपक्रम शेतकरी मिशन तर्फे  आयोजित करण्यात येत असुन हळुहळु सर्व राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मोहीमेला गती आली असुन  व जिल्हा प्रशासनाने अशा  कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्यास पुढाकार घेतला असल्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी या  सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्यामुळे एक चळवळ म्हणुन समोर येत आहे . 
या सरकार आपल्या दरबारी कार्यक्रमात खालील   विषयाच्या तक्रारीचे समाधान करण्यात येणार आहे त्यामध्ये   आदिवासी विकासच्या  कोलाम घरकुल योजना , समाज मंदिर ,युवा रोजगार ,कौशल्य विकास ,आदिवासी विभागाच्या या भागातील कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ ,विषारी पिण्याच्या पाण्याची समस्या ,  ग्राम विकास विभागाच्या  घरकुल ,ग्राम विकास योजनांचा या भागातील जनतेला  मिळालेला लाभ , 

         कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी ,कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ , बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ,कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ,महसूल -या जनतेला  घराचे व शेताचे मालकीचे पट्टे देण्याचे सर्व प्रकरण ,वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्याना नुकसान भरपाई ,या जनतेला गॅस जोडणी ,वन रोजगार ,सिंचन विभागाच्या    केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली   परीसरातील शेतकऱ्यांच्या समस्या ,वीज विभागाच्या   केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली  परीसरातील वीज जोडणी ,वीज पुरवढा या विषयी  समस्या ,शिक्षण - केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली   परीसरातील जनतेच्या  शिक्षणाच्या सवलती व लाभ ,पोलीस प्रशासनाची   केळापूर   तालुक्यातील चनाका ,कोदोरी ,कारेगाव ,हिवरी ,रूढा ,अर्ली  परीसरातीलवरळी मटका व कोंबडा बाजाराचा होत असलेला त्रास  ,दारू विक्रीचा हैदोस रोखण्यासाठी उपाययोजना उपाययोजना ,  अन्न सुरक्षा विभागच्या   उच्चं न्यायालयाचा आदेश नुसार या भागातील गरीब ,कोलाम व पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल तसेच  सहकार विभागाच्या कर्जमाफी पासुन  वंचित असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची  यादीमध्ये असलेला घोळ दूर करणे ,स्टेट बँक  पाटणबोरीमध्ये तीन तीन चकरा मारूनही नवीन पीककर्ज  वाटपामध्ये होत असलेल्या विलंबावर त्यासोबतच अर्ली प्राथमिक  आरोग्यकेंद्राच्या समस्यावर जनसुनवाई यावेळी किशोर तिवारी करणार आहेत .  या घुबडी  येथील  सरकार आपल्यादारी कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन जी. प. पाटणबोरीचे प्रतिनिधीप्रतिनिधी गजुभाऊ बेजंकीवार ,आदिवासी  नेते अंकित नैताम हिवरीचे शिवारेड्डी घुबडीचे गंगारेड्डी तर अर्लीचे नरेंद्र रेड्डी सहभागी होणार आहे 
==========================