Sunday, August 20, 2017

किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात

किशोर तिवारी  २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्हात   
दिनांक २० ऑगस्ट २०१७
स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी २१ ऑगस्टला यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी व केळापुर तालुक्यातील आदीवासी वंचितांच्या वीज पुरवढ्यामध्ये खंड , आरोग्याच्या समस्या ,अन्न सुरक्षा ,निराधार , पीककर्ज ,शिक्षण ,ग्रामीण विकास ,आदीवासी योजना,वरळीमटका ,जुगार ,दारू विक्री   व टिप्पेश्वर अभयारण्यामुळे होत असलेला वन्यप्राण्याचा त्रास , टिप्पेश्वर अभयारण्यामध्ये होत असलेली जंगल तोड ,पारवा व अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची दुरावस्था याची पाहणी व जनतेच्या समस्याची सुनावणी जिल्ह्यातील सर्व उच्च अधिकाऱ्यासोबत करणार आहेत . या दौऱ्यात किशोर तिवारी दुपारी ४ वाजता    सावंगी (सगदा ),संध्याकाळी ५ वाजता मंगी  येथे  ,संध्याकाळी ६ वाजता भीमकुंड येथील टेकडीवर राहणाऱ्या आदिवासींच्या समस्यांची सुनावणी व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे तसेच संध्याकाळी ७ वाजता जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या सोबत अर्ली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट व प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर व कर्मचारी वर्गास पाऊसामुळे होत असलेल्या त्रासापासुन वाजविण्याकरिता उपाय योजनेवर चर्चा करतील . या जनसंपर्क दौऱ्याचा फायदा वंचितांना व आदिवासींनी घ्यावा अशी विनंती स्व वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे जनसपंर्क अधिकारी अशोक कापर्तीवार यांनी केली आहे . 




No comments:

Post a Comment