Monday, February 5, 2018

मुकींदपुर पारधी बेड़ा (नेर )येथे किशोर तिवारी यांचा येत्या ७ फेबु . ला "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "

मुकींदपुर पारधी बेड़ा (नेर )येथे किशोर तिवारी यांचा येत्या ७ फेबु . ला  "सरकार आपल्या दारी कार्यक्रम "
दिनांक -  ६ फेबु.२०१८
नेर तालुक्यातील आजंती व  
मुकींदपुर पारधी बेड़ा  सरकारी उदासीनतेमुळे येत असलेल्या अन्न ,वस्त्र .निवारा .रस्ता .साधे पिण्याचे शुद्ध पाणी या सारख्या समस्या  
चर्चेत आल्यानंतर  आदीवासी ,कोलाम पारधी, शेतकरी यांच्या कडुन आदिवासी विकास ,ग्राम विकास ,कृषी ,महसुल ,वन ,आरोग्य ,सहकार ,वीज ,सिचन ,शिक्षण ,पोलीस , अन्न  सुरक्षा या विभागाच्या प्रचंड तक्रारी सरकार दरबारी आल्यामुळे या विभागाच्या सर्व जिल्हा स्तरीय अधिकाऱ्यांसह तक्रारीचे  समाधान करण्यासाठी कै वसंतराव नाईक शेतकरी मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांचा  येत्या ७ फेबु.ला  
मुकींदपुर पारधी बेड़ा (नेर) सरकार आपल्यादारी कार्यक्रम    आयोजित करण्यात आले  आहे .  
महाराष्ट्र सरकारच्या बळीराजा चेतना  अभियानाचा एक भाग म्हणून ग्रामीण जनतेच्या विकासाच्या व   लोककल्याणाच्या योजना राबविणाऱ्या विभागाच्या जबाबदार अधिकाऱ्यांना गावाच्या चावडी हजर करून सर्व  तक्रारीचे समाधान करण्यासाठी  असा अभिनव उपक्रम शेतकरी मिशन तर्फे  आयोजित करण्यात येत असुन हळुहळु सर्व राजकीय पक्षाच्या व सामाजिक संघटनांच्या सहकार्याने या मोहीमेला गती आली असुन  व जिल्हा प्रशासनाने अशा  कार्यक्रमाचे संपुर्ण नियोजन करण्यास पुढाकार घेतला असल्यामुळे सर्व विभागाचे अधिकारी या  सरकार आपल्यादारी कार्यक्रमाला उपस्थित रहात असल्यामुळे एक चळवळ म्हणुन समोर येत आहे . 
या सरकार आपल्या दरबारी कार्यक्रमात  खालील   विषयाच्या तक्रारीचे समाधान करण्यात येणार आहे त्यामध्ये  
मुकींदपुर पारधी बेड़ा याला  
महसूली गावाचा दर्जा नाही,  पाण्याची समस्याव रस्ता नाही ,बेड्यात अंतर्गत रस्ते नाहीत , विज मीटर व वीज जोडणीची समस्या , रस्त्यावर विज खाम्ब नाहीत ,तसेच  गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार* हा कार्यक्रम इंद्रठाणा व मुकिंदपुर (नेर) दोन पाझर तलावांद्वारे तात्काळ लागू केल्यास किमान १५० पारधी शेतकरी बांधवांना फायदा होईल व १००० पेक्षा जास्त एकरामध्ये गाळ टाकल्या जाईल - व त्यामुळे या दोन्ही पाझर तलावात ३०% पाणी साठा वाढेल, असा  विश्वास  मुख्यमंत्री ग्राम विकास  योजनेचे विषेय अधिकारी व कार्यक्रमाचे संयोजक   आहे राजु केंद्रे  यांनी व्यक्त केला आहे . 
महाराष्ट्राचे महामहिन राज्यपाल विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पारधी व कोलामांच्या  घरकुल योजना , समाज मंदिर ,युवा रोजगार ,कौशल्य विकास ,आदिवासी विभागाच्या या भागातील कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ ,विषारी पिण्याच्या पाण्याची समस्या , कृषी विभागाच्या योजनांचा या भागातील आदिवासी ,कोलाम व पारध्यांना मिळालेला लाभ , बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतकऱ्यांच्या समस्या ,कर्जमाफीच्या योजनांचा या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला लाभ,या जनतेला  घराचे व शेताचे मालकीचे पट्टे देण्याचे सर्व प्रकरण , वन्य प्राण्याचा त्रासामुळे रोजगार गमावलेल्याना नुकसान भरपाई ,या जनतेला गॅस जोडणी ,वन रोजगार ,या  परीसरातील वरळी मटका व कोंबडा बाजाराचा ,दारू विक्रीचा हैदोस रोखण्यासाठी उपाययोजना  , उच्चं न्यायालयाचा आदेश नुसार या भागातील कोलाम व पारध्यांना अंत्योदय योजनेपासून वंचित ठेवणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर केलेल्या कारवाईचा अहवालतसेच कर्जमाफी पासुन  वंचित असलेल्या या भागातील शेतकऱ्यांची  यादी ,  नेर तालुक्यातील  प्राथमिक  आरोग्य केंद्राच्या समस्या यावर अहवाल मागीतला असल्यामुळे या कार्यक्रमास  विषेय महत्व आले आहे .   नेर तालुक्यातील सर्व पारधी बांधवानी या सरकार आपल्या दारी कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस पाटील अनोज पवार ,उपसरपंच आजुबा भोसले ,पुजा पवार . मुख्यमंत्री ग्राम विकास दुत राजू केंद्रे यांनी केले आहे . 

============================================= 

No comments:

Post a Comment